Monday, October 22, 2018

हृदयांशु || भाग - ०५

"जय, तुम्ही निघून गेलात आणि  राहीला तिची चूक जाणवली. पण ती चूक दुरुस्त करणे तिला आता शक्य नव्हते. तुम्ही कुठे आहेत माहिती नव्हते. तुमचा फोन नंबर नव्हता. मेल करून अश्या गोष्टी बोलणे तिला पटत नव्हते. त्या काळात खूप रडली ती. खूप दुःखी, उदास असायची. स्वतःचाच राग यायचा तिला. आणि हे सगळे ती फक्त माझ्याजवळ बोलू शकत होती. साधारण एक- दीड वर्ष झाले असेल तुम्ही तिच्यापासून लांब जाऊन, आणि घरच्यांनी तिच्या मागे लग्नासाठी लकडा लावला. तिला कुणी आवडते का असेही विचारले. आणि वेडाबाई हो म्हणून बसली. मग घरच्यांची प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. कोण आहे, काय करतो, नाव काय, आपल्यापैकी आहे का नाही; एक ना दहा. शेवटी मी मध्ये पडले आणि वेळ मागून घेतला तिच्यासाठी. घरचे सहा-आठ महिने थांबले आणि परत लग्नासाठी विचारू लागले. पण तेव्हा बाई सावरलेल्या होत्या थोड्या. तिने मुले बघायला होकार दिला. पण येणाऱ्या प्रत्येक मुलाची ती तिला आवडणाऱ्या मुलाशी तुलना करायची आणि नकार कळवायची. साधारण एक वर्षभर असेच गेले खूप स्थळं आली आणि गेली. मी तिला खूप समजावले पण तिच्या मनातून 'ती' व्यक्ती काही जात नव्हती. खूप चांगली चांगली स्थळे नाकारली हो पोरीने. माझ्या नवऱ्याचे स्थळ आधी तिलाच आले होते. वेडी आहे पोर. एक दिवस तिच्या मोठ्या काकांच्या कुणा मित्राने एक स्थळ सुचवले. मुलगा इंजिनियर आहे. परदेशी असतो. एकुलता एक. भलतेच भाळले तिचे काका ह्या स्थळाला. तो मुलगा त्यावेळी परदेशीच होता म्हणे. त्याने तिच्याशी बोलायचे आहे म्हणून सांगितले. दोघे फोनवर बोलायचे. Skype वरून चॅटिंग चालायचे. का माहिती नाही पण तिलाही तो बरा वाटला होता. व्हिडीओ कॉलपर्यंत गेले होते. घरच्यांना भेटणे झाले होते. लग्न जवळपास ठरलेच होते. जवळपास काय ठरलेलेच. साखरपुड्याची तारिखपण निघाली. तो २ दिवस आधी येणार होता साखरपुड्यासाठी. पण अचानक रद्द झाले त्याचे येणे. पण काढला मुहूर्त कसा चुकवायचा म्हणून ऑनलाईन साखरपुडा केला तिच्या घरच्यांनी. लग्नाची तारीख २ महिन्यानंतरची निघाली. 
एकदा त्याने तिला सांगितले कि तो एका कॉन्फरन्सला म्हणून मुंबईला येणार आहे. आणि त्याची इच्छा होती की तिने त्याला भेटावे. पण तो फक्त एकाच दिवसासाठी येणार होता आणि त्याने घरी सांगितले नव्हते. आणि त्याची इच्छा होती कि तिनेही घरी काहीच सांगू नये. म्हणून मग मी आणि ती आम्ही दोघी माझे काहीतरी काम आहे असं सांगून मुंबईला गेलो. मोठ्या आलिशान पंचतारांकित हॉटेलात थांबला होता तो. तिथंपर्यंत मी तिला सोबत केली पण तिथून पुढे ती एकटीच गेली. ती जेव्हा परत आली तेव्हा ती प्रचंड रडत होती. काय झाले नाही माहिती."
"तुलाही?"
"हो मलाही नाही सांगितले तिने."
"पण मला माहिती आहे."
"काय? तुम्हाला? पण कसे?"
"कारण त्यावेळी मी तिथेच होतो."
" "
"मी तेव्हा तिथेच त्याच हॉटेल मध्ये होतो. जे झाले ते मी पाहिले होते. त्यांच्यात काय बोलणे झाले नाही माहिती पण जे झाले ते हिरासाठी भयंकर होते."
"हिरा?"
"मी तिला हिरा म्हणतो."
" "
"बाहेर प्रचंड पाऊस कोसळत होता. अश्या पावसात हिराला आवडते"
"चहा आणि भजी"
"बरोब्बर. पण त्या मुलाने मागवली होती रम आणि फ्राईड फिश"
"shitt"
"हिरा खूप अस्वस्थ होती. त्यांच्यात बोलणे चालले तेव्हा प्रचंड चलबिचल होत होती तिची. नंतर एक मुलगी आली." 
" "
"त्या मुलाच्या मांडीवर बसली. किसिंग आणि बरेच प्रकार झाले त्यांच्यात."
"व्हॉट?"
"हो. नि तेही हिरासमोर."
" "
"हिरा खूपच बेचैन होती गं. डोळ्यातल्या आसवांना कसेबसे थांबवले होते तिने. शेवटी निघाली तिथून. बाहेर पडली ती रडत रडतच."
"हे खूप भयंकर आहे.आणि मग तिनेच नकार दिला लग्नाला. किती बोलले आहेत तिला सगळे. तिचे काका, काकू, आत्या सगळेच. त्या मुलाच्या घराचे तर केव्हढे बोलले. तिच्या चारित्र्यावरदेखील संशय घेतला त्यांनी. तरीही हि मुलगी एक अक्षरदेखील बोलली नाही."
"पण हे लग्न तर मोडले. मग श्रीरंग इनामदार? त्यांच्याशी लग्न कसे आणि कधी झाले?"
"सांगते सगळं सांगते. हे लग्न मोडल्यावर तिला सगळी घाणेरडी स्थळे यायला लागली. घटस्फोटित, विधुर, व्यंग असलेली."
"भयंकर, काय गं आपला समाज. मुलीचे लग्न मोडले कि ती इतकी वाईट होते का गं?"
"हं. ह्या अश्या स्थळात तिचे ४-६ महिने गेले. पोर पार कोमेजलेली. तिचा सगळा आत्मविश्वास संपला होता. अश्यातच तिच्या मावशीने एक स्थळ आणले. सगळे सेम होते. मुलगा परदेशात. त्याला एक बहीण होती. तीदेखील परदेशातच. दिसायलाही मुलगा स्मार्ट होता. आणि हिच्या मोडलेल्या लग्नाशी त्यांना काहीही आक्षेप नव्हता. हाच तो श्रीरंग इनामदार. पण त्याच्यासोबत मात्र हीच रीतसर कांदापोहे कार्यक्रम झाला. त्याला हि बघताक्षणीच आवडली. आणि त्याच्या आईवडिलांनी लगेच होकार सांगितला. लग्न मोडले म्हणून आता राहीला काहीच अधिकार नव्हता होकार-नकार सांगण्यात. आणि हे लग्न ठरले. दोन महिन्यात लग्न झाले आणि राहीबाई उडाल्या बुंग."
"नीरजा, ह्या काळात तुझा श्रीरंगशी किती परिचय झाला? किती संपर्क होता?"
"श्रीरंगशी संपर्क फारसा नव्हताच. पण तो माणूस खूप चांगला वाटलं मला. बोलायला, वागायला. caring वाटला. त्यावेळी मी प्रेग्नंट होते. तेव्हा मी. तिला वेळंच नाही देऊ शकले."
"हिरा इकडे आल्यानंतर तुमचे काय बोलणे झाले? किंवा काय बोलणे होते?"
"राही आणि मी फार क्वचित बोलतो. व्हिडिओ कॉल नाही होत आमचा. फेसबुकवर फोटो पण नसतात. बघितलेच नाहीये मी तिला लग्नानंतर. फोनवर पण जुजबी बोलते मी मस्त ठीक तू बोल ग कशीयेस. आणि मग मी काय सुटतेच. मी, माझा नवरा, माझा मुलगा, माझा संसार. हेच बोलतो आम्ही. तिच्याबद्दल आम्ही कधीच नाही बोललो. आम्ही बोललोच नाहीये तिच्याबद्दल. आणि हे आतल्या लक्षात येतेय माझ्या. कशीये हो माझी राही?"
"नीरजा, हिरा ठीक नाहीये. अगं साडी नेसली होती आज. अगदीच काडी झालेय गं. मलापण तिच्याशी बोलायला नाही मिळाले. श्रीरंग चे तिच्याशी वागणे मला खूप खटकले. ती मोजून १० शब्द देखील बोलली नसेल माझ्याशी. राहवेना मला. नीरजा हिरा संकटात आहे असे वाटतेय मला. म्हणून तिच्या लग्नाची गोष्ट तुला विचारायला मी तुला मेसेज केला."
" "
"नीरजा?"
" " 
"नीरजा? हॅलो?
" "
"नीरजा? तू रडतेयस? नको रडू अगं. तू आणि मी असे रडलो तर हिराला ह्यातून बाहेर कोण काढणार? Be Strong. Be Brave. Be Fearless. Be positive."
"हो जय, पण अशी कशी मी? ती एवढी संकटात आहे आणि मला कधीच कळाले नाही."
"नीरजा"
"हो मी आहे तुमच्यासोबत. तुम्हाला काय लागेल ती मदत मी करेन. मी तिच्या घरी जाऊन जरा अंदाज घेते तिच्या बहिणींशी बोलून. आणि त्याच्या घरी काही माहिती लागते का हाताशी ते बघते."
"वाह! हेच हवे मला. मीदेखील प्रयत्न करतोय. आपण दोघे लवकरात लवकर तिला ह्यातून बाहेर काढू."
"नक्कीच."
" "
"जय, वाजलेत किती तिकडे?"
"आत्ता पहाटेचे ५.३० वाजलेत."
"का गं?"
"तुम्ही आत्ता जागे?"
"हा. हो अगं. झोप लागत नाही."
"समजू शकते मी."
" "
"जय, जागी तर तीसुद्धा असणारे आज."
"कशी काय?"
"हो. तुम्हाला भेटल्या नंतर ती शांत झोपूच शकत नाही. एव्हढेतर मी तिला ओळखते."
"मग? काही करत येईल का आत्ता?"
"माझ्याकडे श्रीरंगचा नंबर आहे. तिच्याकडे फोन नाहीये. आणि हेसुद्धा आत्ता लक्षात येतेय माझ्या."
" "
"मी श्रीरंग ला फोन करू का?"
"पण त्याने काय होईल?"
"तो वैतागून तिला देईल ना फोन आणि मग आपण कॉन्फरन्स कॉलवर बोलू तिच्याशी."
" "
"प्रयत्न करून बघू."
"मला मिस्डकॉल द्या ८०८५xxxx२४."
"बरं"
एवढ्या रात्री तो रंग्या फोन उचलेल का? आणि उचलला तरी हीराला देईल का? काहीच कळत नाहीये. नीरजा म्हणतेय ती करेल काहीतरी आणि पोहचेल हीरापर्यंत. Let's hope for the best. Be positive Hrudayanshu. Be positive. Relax. Breathe deep. Take a deep breathe. Inhale exhale. Inhale exhale. 


1 comment:

Unknown said...

हा आता भारी चालला आहे. नेक्स्ट प्लीज