Thursday, June 9, 2011

पाउस आणि आठवणी

पाउस आणि त्याच्या आठवणींवर आजवर इतके लोक इतक्या प्रकाराने बोलले आणि लिहिले आहेत ना....
पाउस आणि पर्यायाने पावसाळा चालू होणार म्हटले कि रेडियो आणि टेलिव्हिजन वर सगळी पाउस सदृश गाणी वाजतात. अगदी 'प्यार हुआ इकरार हुआ' पासून ते अगदी बरसो रे मेघा' पर्यंत. पण खरे सांगू मला पाउस म्हटले कि आठवते ते आमच्या शाळेत शिकवलेले 'हिरवी छाया हिरवी माया' असे काहीतरी होते ते गाणे. हे गाणे आठवण्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेत जेव्हा हे गाणे शिकवले तेव्हा माझा भड्डक्क हिरव्या नाही फ्लुरोसंट हिरव्या रंगाचा ट्रान्सपरंट रेनकोट होता. आणि मी तो रेनकोट घातला कि माझ्या मैत्रिणी हे गाणे म्हणायच्या. तेव्हा राग यायचा पण आता आठवले कि हसू येते.
पाउस म्हटले कि कुणाला महाबळेश्वर, तर कुणाला सिंहगड, तर आणि कुणाला लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा आठवतो. पण मला काय आठवते सांगू? मला आठवते ते सकाळी शाळेला जायची तयारी करून बसलेली मी. शिवदत्त निवांत च्या दारात वहिनींची वाट बघत बसलेली. उगाचच दाराशी खेळ करत, तो काळभोर स्वच्छ धुतल्या सारखा काळभोर रस्ता बघत. मग कधीतरी वासुकाका ओरडायचे ' ए अंधार सोड' मग मी वर गच्चीत जाऊन बसणार. पण काम तेच काळभोर रस्ता बघत वहिनींची वाट बघायचे. मग कधीतरी वाहिनी यायच्या सगळ्या वाटेत गोळा केलेल्या पोरांचे लटांबर घेऊन आणि ओरडायच्या 'ज्ञानाsssss'. आणि मग धावत पळत काह्ली येणार दप्तर पाठीवर अडकवून शाळेत पळणार.
शाळेत आपले नवीन दप्तर मैत्रीणीना दाखवायचे, त्यांचे बघायचे. आणि मग कुणाच्या दप्तराला किती कप्पे जास्त ते पहायचे. एकमेकींच्या नवीन वह्या बघायच्या. त्यावर कुणाच्या वहिला छान चित्र आहे ते पाहायचे. आणि मग जर सारख्या असतील म्हणजे करियर, महालक्ष्मी, नवनीत, आणि मग क्लासमेट च्या वह्या असतील तर ..' ए मी सायन्स ला हे वही घालणारे तू कुठली घालणारेस? हे डिझाईन असणारी नको हं घालू' आत्ता आठवले तरी मज्जा वाटते.
पाउस म्हटले कि मला आमचे जुने, म्हणजे दुधाळी मधले घर आठवते. त्या घरासमोर एक मोट्ठे मैदान होते. दुधाळी पॅव्हेलियन. तिथे पाउस चालू झाला कि मुले फुटबॉल खेळायला यायची. म्हणजे ज्यांना फुटबॉलचा फ देखील माहित नाही तीपण यायची. पण पाउस जसा वाढेल तशी ह्या मुलांची जागा कोण घ्यायचे माहिती आहे? चक्क म्हशी. अर्थात त्या काही फुटबॉल नाही खेळायच्या. पण दिवसभर त्या पावसाच्या साचलेल्या पाण्यात बसून राहायच्या. त्या हिरव्यागार मैदानावर त्या काळ्याभोर म्हशी. तेव्हा मज्जा वाटायची खूप.
पाउस म्हटले कि कुणाला महाबळेश्वर, तर कुणाला सिंहगड, तर आणि कुणाला लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा आठवतो. पण मला काय आठवते सांगू? मला आठवते ते सकाळी शाळेला जायची तयारी करून बसलेली मी. शिवदत्त निवांत च्या दारात वहिनींची वाट बघत बसलेली. उगाचच दाराशी खेळ करत, तो काळभोर स्वच्छ धुतल्या सारखा काळभोर रस्ता बघत. मग कधीतरी वासुकाका ओरडायचे ' ए अंधार सोड' मग मी वर गच्चीत जाऊन बसणार. पण काम तेच काळभोर रस्ता बघत वहिनींची वाट बघायचे. मग कधीतरी वाहिनी यायच्या सगळ्या वाटेत गोळा केलेल्या पोरांचे लटांबर घेऊन आणि ओरडायच्या 'ज्ञानाsssss'. आणि मग धावत पळत काह्ली येणार दप्तर पाठीवर अडकवून शाळेत पळणार.
शाळेत आपले नवीन दप्तर मैत्रीणीना दाखवायचे, त्यांचे बघायचे. आणि मग कुणाच्या दप्तराला किती कप्पे जास्त ते पहायचे. एकमेकींच्या नवीन वह्या बघायच्या. त्यावर कुणाच्या वहिला छान चित्र आहे ते पाहायचे. आणि मग जर सारख्या असतील म्हणजे करियर, महालक्ष्मी, नवनीत, आणि मग क्लासमेट च्या वह्या असतील तर ..' ए मी सायन्स ला हे वही घालणारे तू कुठली घालणारेस? हे डिझाईन असणारी नको हं घालू' आत्ता आठवले तरी मज्जा वाटते.
पण कितीही पुढे जा पाण्याचे लोंढे आपले चालूच आणि गाडी कुठेही फसत नव्हती. कशी फसणार, कॉलेज छान पैकी टेकडीवर आहे ना.
त्यानंतर आठवणारा पावसाला म्हणजे, ताईला तिच्या कॉलेज मध्ये म्हणजेच के.आय.टी. मध्ये आई बाबांसोबत गाडीत बसून गेले होते. तेव्हा डोक्यात इंजिनियर होण्याचा जराही विचार नव्हता. आणि तो प्रचंड पाउस पाहिला. केव्हढा प्रचंड. रस्त्याने केव्हढे मोट्ठे लोंढे वाहत होते पाण्याचे. असे वाटले कि नाहीच थोडे पुढे गेलो न तर नक्कीच कमरे एव्हढ्या पाण्यात अडकणार.
के.आय.टी चा विषय निघाला आहे तर सांगते ह्या कॉलेज वरून पाउस अगदी अप्रतिम दिसतो आणि भासतो.
त्यानंतर मी जेव्हा कॉलेज जॉईन केले ना त्यावर्षीचा तर प्रत्येक पाउस माझ्या आठवणीत आहे. त्यातील दोन सांगते.
पहिल्यांदाच मी तिची गाडी घेऊन कॉलेज ला गेले येताना छानपैकी पाउस लागला. आधी वर्णन केल्यासारखा मस्त. आणि मस्तपैकी माझी गाडी बंद पडली. बर माझी कुणाशी फारशी ओळखही नाही मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीच. कॉलेज सुटले होते खूप मुले जात होती पण एक्कानेही मदत केली नाही. फार वाईट वाटले. कॉलेज जवळ होते म्हणजे जर गाडी ढकलत न्यावी लागली तर तब्बल ६-७ किलोमीटर ढकलावी लागणार तेही भर पावसात. पण सुदैवाने दोन मित्र (त्यांच्याशी माझी नंतर मैत्री झाली तेव्हा नव्हती) थांबले त्यांनी गाडी चालू करून दिली. इतकेच नाही तर बाईक वर असूनही माझ्या खतरा स्पिरिटच्या मागे थांबले. का तर गाडी परत बंद पडली तर मदत करता यावी म्हणून.
त्यानंतर चा पाउस फारच वाईट होता. तशीच परिस्थिती होती. भयाण पाउस आधीपेक्षाही भयानक. गाडी बंद पडली. कुणीच थांबेना. मी पावसात भिजत किक मारत होते. माझी मैत्रीण देखील प्रयत्न करत होती पण यशच नव्हते. तशीच उतारावरून ढकलत कशीबशी खाली उतरवली पण पुढे काय? तेव्हढ्यात पुन्हा एकदा एका मुलगा थांबला. त्यानेही खूप किक मारल्या पण शून्य. गाडी चालूच होत नव्हती. त्याला काय वाटले काय माहित, त्याने अचानक बटन मारले आणि गाडी चालू झाली.
पण माझे दुर्दैव आणि थोड्या अंतराने गाडी परत बंद पडली. पण तोवर आम्ही निर्मनुष्य रस्त्यावरून मानासालालेल्या रस्त्याला लागलो होतो. तिथेच एका घरात गाडी लावली आणि मी मैत्रिणीच्या घरी गेले. तिथे वडिलांचा फोन कि माझे काका वारले म्हणून. मग मी ताबडतोब तेथून निघाले पण मला एकही रिक्षा मिळेना निम्मा रस्ता चालल्यावर मला रिक्षा मिळाली. तो पाउस मी कधीच विसरू शकणार नाही.
त्यानंतर अनेक पावसाळे आले आणि गेले. त्या प्रत्येकाच्या स्वत:च्या अश्या वेगळ्या आठवणी आहेत. तश्या त्या प्रत्येकाच्या असतात.
पाउस म्हटले कि आठवणी, कविता, गाणी ह्यांचा नुसता हलकल्लोळ असतो नाही का?

Wednesday, June 8, 2011

मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट

मुक्तांगण काय आहे हे मला माहित नव्हते. खुपते तिथे गुप्ते मध्ये अनिल अवचट आले होते एका भागात तो भाग मी पहिला आणि इतर कामात डोक्यातून गेलादेखील. पण सुट्टी चालू झाली आणि काहीतरी नवीन छान वाचावे म्हणून सगळी पुस्तके धुंडाळली तेव्हा हे पुस्तक हातात पडले. समकालीन प्रकाशनाचे. युनिक फीचर्स ची बरीच पुस्तके खरेदी केली त्यातले हे एक. पुस्तक पहिले आणि म्हटले बघू आहे तरी काय. आणि जेव्हा प्रस्तावना वाचली तेव्हाच ठरवले कि हे अजब आहे आणि ते वाचलेच पाहिजे. आणि जसजशी मी वाचत गेले मी आश्चर्य चकित झाले कि हे शक्य आहे. मी कधी कुणा व्यसनाधीन माणसाला पाहिले नव्हते. पण कधीमधी रस्त्यात बाजूला वाकडी तिकडी पडलेली माणसे पहिली आहेत. कधीच मी त्या लोकांचा विचार केला नव्हता. पण पुस्तक वाचताना जाणवले कि आता बास शिक्षण पूर्ण झाले कि आपण तिथे निदान आठवड्यातले सुट्टीचे दिवस तरी जायचेच.
पण पुस्तक जसजसे पुढे गेले आणि एकेठिकाणी मला जाणवले कि हे माझ्यासारख्या मुलीला कधीच शक्य नाही. ते अनिल अवचट ( बाबा ) आणि त्यांच्यासारख्या इतरांनाच शक्य.
ह्या पुस्तकाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य असे कि ते वाचताना आपण तिथे मुक्तांगण मध्ये पोहोचतोच. मी हे पुस्तक वाचताना मुक्तांगण मध्ये गेले तिथल्या 'त्या' पेशंटना देखील पाहून आले. मुक्तांगणची गोष्ट आपण वाचत नाही तर आपण ती ऐकतो आहोत हि भावना वाचणा-याच्या मनात निर्माण होणे ह्यामध्ये लेखकाचा खूप मोठा विजय आहे असे मला वाटते.
एखादी व्यक्ती जर एकच गोष्ट वारंवार करत असेल तर आपण चिडतो, वैतागतो, आदळआपट करतो. पण जेव्हा आपण समजावलेला, आपले ऐकून काही काल शांत, निवांत आयुष्य जगणारा माणूस पुन्हा त्या व्यसनाच्या काळ्या डोहात जातो, बुडतो तेव्हा त्या माणसाने किती चिडावे? पण मुक्तांगणचा बाबा, तिथल्या प्रत्येक मुलाचा बाबा असे काही करत नाही तो शांत राहतो. त्या मित्राकडून वचन घेतो पुन्हा असे न करण्याचे आणि बाबा मागतो म्हटल्यावर तो मित्र देखील वचन देतो. आणि बहुतेक बाबाला दिलेला शब्द पाळतात. खरेच बाबा तुमच्या कार्याला सलाम.
बाबा म्हणतो, ' ह्या सा-याचे credit सुनंदाचे आहे. तिने चालू केले ते आणि तसेच पुढे नेण्याचे काम मी केले.' सुनंदा म्हणजे बाबांची पत्नी. डॉ. सुनंदा (अनिता) अवचट. सा-या मुक्तांगणच्या मॅडम अहं लाडक्या मॅडम. पेशंट इतर कुणाचेही नाही ऐकले तरी मॅडमचे नक्की ऐकणार तशी हातोटीच होती मॅडमची. मुक्तांगण आपल्या स्वत:च्या नवीन इमारती मध्ये हलत असतानाच कॅन्सर सारख्या असाध्य रोगाने त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यावेळेपर्यंत त्यांना एवढे यश आले होते कि त्या गेल्या नंतर दु:खाचा एवढा अतिरेक होऊनही त्यांचा एकही पेशंट परत व्यसनं कडे नाही वळला. मॅडमनी केवळ पेशंटना व्यसनमुक्तच नाही तर एक चांगला माणूस देखील बनवले. किंबहुना मुक्तांगण चालू करताना हेच ध्येय होते त्यांचे कि प्रत्येक व्यसनाधीन माणसाला एक चांगला जबाबदार नागरिक बनवायचे. आणि ते काही अंशी पूर्णही झाले.
मुक्तांगणची गोष्ट वाचल्याने मी एक गोष्ट शिकले की स्वत:वर, स्वत:च्या रागावर संयम ठेवायचा. निदान तसा प्रयत्न तरी करायचा कधीनाकाधी सफल होऊच ना. आणि जर पुस्तक वाचणारा प्रत्येक जन हे करू शकला तर जगात शांतता का नाही येणार. तेव्हा जरूर वाचावे असे आहे मुक्तांगणची गोष्ट.