पाउस आणि पर्यायाने पावसाळा चालू होणार म्हटले कि रेडियो आणि टेलिव्हिजन वर सगळी पाउस सदृश गाणी वाजतात. अगदी 'प्यार हुआ इकरार हुआ' पासून ते अगदी बरसो रे मेघा' पर्यंत. पण खरे सांगू मला पाउस म्हटले कि आठवते ते आमच्या शाळेत शिकवलेले 'हिरवी छाया हिरवी माया' असे काहीतरी होते ते गाणे. हे गाणे आठवण्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेत जेव्हा हे गाणे शिकवले तेव्हा माझा भड्डक्क हिरव्या नाही फ्लुरोसंट हिरव्या रंगाचा ट्रान्सपरंट रेनकोट होता. आणि मी तो रेनकोट घातला कि माझ्या मैत्रिणी हे गाणे म्हणायच्या. तेव्हा राग यायचा पण आता आठवले कि हसू येते.
पाउस म्हटले कि कुणाला महाबळेश्वर, तर कुणाला सिंहगड, तर आणि कुणाला लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा आठवतो. पण मला काय आठवते सांगू? मला आठवते ते सकाळी शाळेला जायची तयारी करून बसलेली मी. शिवदत्त निवांत च्या दारात वहिनींची वाट बघत बसलेली. उगाचच दाराशी खेळ करत, तो काळभोर स्वच्छ धुतल्या सारखा काळभोर रस्ता बघत. मग कधीतरी वासुकाका ओरडायचे ' ए अंधार सोड' मग मी वर गच्चीत जाऊन बसणार. पण काम तेच काळभोर रस्ता बघत वहिनींची वाट बघायचे. मग कधीतरी वाहिनी यायच्या सगळ्या वाटेत गोळा केलेल्या पोरांचे लटांबर घेऊन आणि ओरडायच्या 'ज्ञानाsssss'. आणि मग धावत पळत काह्ली येणार दप्तर पाठीवर अडकवून शाळेत पळणार.
शाळेत आपले नवीन दप्तर मैत्रीणीना दाखवायचे, त्यांचे बघायचे. आणि मग कुणाच्या दप्तराला किती कप्पे जास्त ते पहायचे. एकमेकींच्या नवीन वह्या बघायच्या. त्यावर कुणाच्या वहिला छान चित्र आहे ते पाहायचे. आणि मग जर सारख्या असतील म्हणजे करियर, महालक्ष्मी, नवनीत, आणि मग क्लासमेट च्या वह्या असतील तर ..' ए मी सायन्स ला हे वही घालणारे तू कुठली घालणारेस? हे डिझाईन असणारी नको हं घालू' आत्ता आठवले तरी मज्जा वाटते.
पाउस म्हटले कि मला आमचे जुने, म्हणजे दुधाळी मधले घर आठवते. त्या घरासमोर एक मोट्ठे मैदान होते. दुधाळी पॅव्हेलियन. तिथे पाउस चालू झाला कि मुले फुटबॉल खेळायला यायची. म्हणजे ज्यांना फुटबॉलचा फ देखील माहित नाही तीपण यायची. पण पाउस जसा वाढेल तशी ह्या मुलांची जागा कोण घ्यायचे माहिती आहे? चक्क म्हशी. अर्थात त्या काही फुटबॉल नाही खेळायच्या. पण दिवसभर त्या पावसाच्या साचलेल्या पाण्यात बसून राहायच्या. त्या हिरव्यागार मैदानावर त्या काळ्याभोर म्हशी. तेव्हा मज्जा वाटायची खूप.
पाउस म्हटले कि कुणाला महाबळेश्वर, तर कुणाला सिंहगड, तर आणि कुणाला लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा आठवतो. पण मला काय आठवते सांगू? मला आठवते ते सकाळी शाळेला जायची तयारी करून बसलेली मी. शिवदत्त निवांत च्या दारात वहिनींची वाट बघत बसलेली. उगाचच दाराशी खेळ करत, तो काळभोर स्वच्छ धुतल्या सारखा काळभोर रस्ता बघत. मग कधीतरी वासुकाका ओरडायचे ' ए अंधार सोड' मग मी वर गच्चीत जाऊन बसणार. पण काम तेच काळभोर रस्ता बघत वहिनींची वाट बघायचे. मग कधीतरी वाहिनी यायच्या सगळ्या वाटेत गोळा केलेल्या पोरांचे लटांबर घेऊन आणि ओरडायच्या 'ज्ञानाsssss'. आणि मग धावत पळत काह्ली येणार दप्तर पाठीवर अडकवून शाळेत पळणार.
शाळेत आपले नवीन दप्तर मैत्रीणीना दाखवायचे, त्यांचे बघायचे. आणि मग कुणाच्या दप्तराला किती कप्पे जास्त ते पहायचे. एकमेकींच्या नवीन वह्या बघायच्या. त्यावर कुणाच्या वहिला छान चित्र आहे ते पाहायचे. आणि मग जर सारख्या असतील म्हणजे करियर, महालक्ष्मी, नवनीत, आणि मग क्लासमेट च्या वह्या असतील तर ..' ए मी सायन्स ला हे वही घालणारे तू कुठली घालणारेस? हे डिझाईन असणारी नको हं घालू' आत्ता आठवले तरी मज्जा वाटते.
पण कितीही पुढे जा पाण्याचे लोंढे आपले चालूच आणि गाडी कुठेही फसत नव्हती. कशी फसणार, कॉलेज छान पैकी टेकडीवर आहे ना. त्यानंतर आठवणारा पावसाला म्हणजे, ताईला तिच्या कॉलेज मध्ये म्हणजेच के.आय.टी. मध्ये आई बाबांसोबत गाडीत बसून गेले होते. तेव्हा डोक्यात इंजिनियर होण्याचा जराही विचार नव्हता. आणि तो प्रचंड पाउस पाहिला. केव्हढा प्रचंड. रस्त्याने केव्हढे मोट्ठे लोंढे वाहत होते पाण्याचे. असे वाटले कि नाहीच थोडे पुढे गेलो न तर नक्कीच कमरे एव्हढ्या पाण्यात अडकणार.
के.आय.टी चा विषय निघाला आहे तर सांगते ह्या कॉलेज वरून पाउस अगदी अप्रतिम दिसतो आणि भासतो.
त्यानंतर मी जेव्हा कॉलेज जॉईन केले ना त्यावर्षीचा तर प्रत्येक पाउस माझ्या आठवणीत आहे. त्यातील दोन सांगते.
पहिल्यांदाच मी तिची गाडी घेऊन कॉलेज ला गेले येताना छानपैकी पाउस लागला. आधी वर्णन केल्यासारखा मस्त. आणि मस्तपैकी माझी गाडी बंद पडली. बर माझी कुणाशी फारशी ओळखही नाही मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीच. कॉलेज सुटले होते खूप मुले जात होती पण एक्कानेही मदत केली नाही. फार वाईट वाटले. कॉलेज जवळ होते म्हणजे जर गाडी ढकलत न्यावी लागली तर तब्बल ६-७ किलोमीटर ढकलावी लागणार तेही भर पावसात. पण सुदैवाने दोन मित्र (त्यांच्याशी माझी नंतर मैत्री झाली तेव्हा नव्हती) थांबले त्यांनी गाडी चालू करून दिली. इतकेच नाही तर बाईक वर असूनही माझ्या खतरा स्पिरिटच्या मागे थांबले. का तर गाडी परत बंद पडली तर मदत करता यावी म्हणून.
त्यानंतर चा पाउस फारच वाईट होता. तशीच परिस्थिती होती. भयाण पाउस आधीपेक्षाही भयानक. गाडी बंद पडली. कुणीच थांबेना. मी पावसात भिजत किक मारत होते. माझी मैत्रीण देखील प्रयत्न करत होती पण यशच नव्हते. तशीच उतारावरून ढकलत कशीबशी खाली उतरवली पण पुढे काय? तेव्हढ्यात पुन्हा एकदा एका मुलगा थांबला. त्यानेही खूप किक मारल्या पण शून्य. गाडी चालूच होत नव्हती. त्याला काय वाटले काय माहित, त्याने अचानक बटन मारले आणि गाडी चालू झाली.
पण माझे दुर्दैव आणि थोड्या अंतराने गाडी परत बंद पडली. पण तोवर आम्ही निर्मनुष्य रस्त्यावरून मानासालालेल्या रस्त्याला लागलो होतो. तिथेच एका घरात गाडी लावली आणि मी मैत्रिणीच्या घरी गेले. तिथे वडिलांचा फोन कि माझे काका वारले म्हणून. मग मी ताबडतोब तेथून निघाले पण मला एकही रिक्षा मिळेना निम्मा रस्ता चालल्यावर मला रिक्षा मिळाली. तो पाउस मी कधीच विसरू शकणार नाही.
त्यानंतर अनेक पावसाळे आले आणि गेले. त्या प्रत्येकाच्या स्वत:च्या अश्या वेगळ्या आठवणी आहेत. तश्या त्या प्रत्येकाच्या असतात.
पाउस म्हटले कि आठवणी, कविता, गाणी ह्यांचा नुसता हलकल्लोळ असतो नाही का?